सामाजिक

लव्ह जिहाद कायदा करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाज बांधवांनी काढला शहरातून भव्य मोर्चा!

अहमदनगर दि.१४डिसेंबर( प्रतिनिधी)हिंदुत्त्ववादी संघटनांच्या वतीने लव्ह जिहाद कायदा करण्याच्या मागणीसाठी नगर शहरांमध्ये बुधवारी १४ डिसेंबर रोजी काढलेल्या मोर्चास मोठी गर्दी झाली.यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पुढे माळीवाड्यातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या मोर्चाची सुरूवात झाली.हिंदुत्त्वादी नेते कालीचरण व काजल दीदी हिंदुस्तानी या मोर्चात सहभागी झाले होते.जुन्या बसस्थानकजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा माळीवाडा,आशा टॉकीज चौक,माणिक चौक, कापडबाजार,तेलीखुंट, चितळे रस्त्यामार्गे दिल्लीगेट जवळ आला व दिल्लीगेटजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.या मोर्चाला कालीचरण महाराज व काजल दीदी हिंदुस्तानी यांनी संबोधित केले.या मोर्चाला विविध हिंदुत्वादी संघटनेने पाठिंबा दर्शवून प्रत्यक्ष सहभागी झाले.यावेळी मोर्चाला खूप गर्दी असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे