राजकिय

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट गायरान जमिनीवरील सन 2010 पर्यंत चे अतिक्रमण नियमित करण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी

 

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :मुंबई दि.2 जुलै – गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करणार शासन निर्णय 14 एप्रिल 1990 मध्ये काढण्यात आला होता.त्या मुदतीत वाढ करून आता 14 एप्रिल 2010 पर्यंत ची गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करणारा शासन निर्णय राज्य सरकार ने घ्यावा अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली.रिपब्लिकन पक्षाच्या विविध मागण्यांबाबत चे निवेदन ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे युवक आघाडी चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पप्पू कागदे उपस्थित होते.
रिपब्लिकन पक्ष महायुती चा प्रमुख घटक पक्ष असून भाजप ने रिपब्लिकन पक्षाला एक विधान परिषद सदस्य पद द्यावे तसेच महायुती सरकार मध्ये किमान दोन महामंडळाचे अध्यक्ष पद द्यावे तसेच अन्य महामंडळाचे सदस्यत्व द्यावे तसेच राज्यभरात सर्व जिल्हा ;तालुका स्तरावर रिपब्लिकन कार्यकर्त्यांना विविध शासकीय समितीत सदस्य पदे द्यावीत अशी आग्रही मागणी ना. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी रिपब्लिकन पक्षाला एम एल सी देण्याबाबत तसेच महामंडळाचे अध्यक्ष पदे देण्याबाबत निश्चित लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यासाठी च्या 1990 च्या मुदतीत वाढ करून 2014 पर्यंत चे गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याबाबत विचार करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ना. रामदास आठवले यांना दिले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे