श्रीनिवास बोज्जा यांना राष्ट्रीय एकता पुरस्कार दिल्लीत रविवारी होणार सन्मान

अहमदनगर दि.१० (प्रतिनिधी): आझादी की अमृत महोत्सवातंर्गत दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाकडून देण्यात येणारा ‘राष्ट्रीय एकता पुरस्कार’ विश्व निर्मल फौंडेशन चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांना जाहीर झाला आहे. रविवारी (दि.13) दिल्लीतील कॉन्सीटीट्यूशन क्लबमध्ये बोज्जा यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे.
समाजाच्या विविध घटकात उल्लेखनिय कार्य करणार्या देशभरातील व्यक्तींचा सन्मान दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाकडून केला जाणार आहे. आयोगाचे सल्लागार अनुप चावला यांनी श्रीनिवास बोज्जा यांना या पुरस्काराची घोषणा केली आहे. आयोगाचे अध्यक्ष जगदीश यादव, सचिव रंजीत सिंह यांच्या उपस्थितीत कर्नल पूनम सिंग,जीएसटी कमिशनर सारांश महाजन, प्रसिध्द गायक पंडित बलदेवराज वर्मा (इंदौर), निवृत्त जिल्हा न्यायाधीश पिंकी महाजन (दिल्ली) यांच्या हस्ते हा पुरस्कार बोज्जा यांना प्रदान केला जाणार आहे.
श्रीनिवास बोज्जा यांनी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सामाजिक कार्याबरोबरच शैक्षणिक व आध्यत्मिक कार्यात अग्रेसर काम केले आहे व करीत आहे. विश्व निर्मल फौंडेशन शैक्षणिक संस्थेचे वतीने बोल्हेगाव भागातील गरीब विदयार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने शाळा सुरु करून अत्यंत कमी फी मध्ये सर्व सुविधा विदयार्थ्यांना प्राप्त करून दिले असून विशेष म्हणजे कामगारांच्या मुलांना प्रथम प्राधान्य दिले जाते. तसेच अध्यात्मिक गुरु प. पु. माताजी श्री निर्मलादेवी यांच्या कृपा आशीर्वादाने सहजयोग या अध्यात्मिक परिवारात काम करत असून अहमदनगर जिल्ह्याचे समन्वयक म्हणून काम पहात आहे तसेच अहमदनगर येथे सहजयोग चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून या संस्थेचे वतीने गोविंदपुरा भागात सांस्कृतिक केंद्र निर्माण केले व त्या ठिकाणी ध्यान साधनेचे वर्ग विनामूल्य घेतले जात असून अनेक सामाजिक कार्य ही केले जाते.
तसेच व्यवसायिक क्षेत्रात काम करीत असतांना दि अहमदनगर फटाका व्यापारी असो. चे अध्यक्ष म्हणून गेले अनेक वर्षे काम केले असून या संस्थेचे वतीनेही अहमदनगर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रात नाव लौकिक केले आहे.
सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना समाजसेवक अण्णा हजारे यांचे आदर्श घेऊन अनेक सामाजिक कार्यात हिरारीने भाग घेतला असून भ्रष्टाचार विरोधी लढ्यात ही चांगले कार्य केले आहे.
राजकीय क्षेत्रात काम करीत असतांना पत्नी सौ. वीणा बोज्जा यांना नगरसेविका करून प्रभागामध्ये चांगले कार्य करून त्यांना राज्यस्तरीय बेस्ट नगरसेविका अवार्डही प्राप्त झाले आहे. या सर्व उपक्रमाची दखल घेत बोज्जा यांचे सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक व राजकीय कार्याचा विचार करून त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.