आंबेडकरी समाजाचा जन आक्रोश मोर्चा अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला!

अहमदनगर दि. १३ जून (प्रतिनिधी) :-नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली या ठिकाणी अक्षय भालेराव या तरुणाची हत्या झाली होती. सदर तरुणाची हत्या ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून करण्यात आली. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आणि इतर विविध मागण्यांसाठी आज (13 जून) रोजी अहमदनगर शहरात आंबेडकरवादी जनतेने आक्रोश मोर्चाचे आयोजन केलं आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव याच्या पोटावर खंजरने सपासप वार करुन निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. एवढंच नाहीतर हत्या केल्यानंतर दलित वस्तीवर दगडफेकही केली.
दरम्यान, या घटनेचे पडसाद नगर जिल्ह्यात देखील उमटू लागले आहेत. या हत्याकांडातील सर्व आरोपींवर कडक कारवाई करून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी व्हावी, तसेच आरोपींना कठोरातील कठोर शासन व्हावे, अशी मुख्य मागणी घेऊन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.यावेळी अक्षय भालेराव ला न्याय मिळाला पाहिजे असे पोस्टर या मोर्चात पाहिला मिळाले या मोर्चा मध्ये हजारो च्या संख्येने पुरुष महिला तरुणवर्ग सहभागी झाला होता.
यावेळी
जेष्ठ नेते अशोक गायकवाड सुरेश बनसोडे, सुनील साळवे,प्रा जयंत गायकवाड,सुनील शिंदे, नितीन कसबेकर ,सुनील क्षेत्रे, सुमेध गायकवाड,कौशल गायकवाड, रोहित आव्हाड, पत्रकार महेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते सुरेश भिंगारदिवे, गौतमी भिंगारदिवे,राणीताई दाभाडे, नितीन साळवे, संजय साळवे, संजय जगताप, विशाल भिंगारदिवे,सारंग पटेकर, सुशांत मस्के,विजय भांबळ, उत्कर्षाताई रुपवते सुरेंद्र थोरात, विजयराव वाघचौरे, क्रो. आनंत लोखंडे,किरण दाभाडे, राहुल कांबळे, नगरसेवक प्रशांत गायकवाड ,शोभा गाडे ,मीराबाई भिंगारदिवे सुनील भिंगारदिवे, (सर) ,धनंजय पाचारने , अक्षय भिंगारदिवे, अमित काळे,अमोल गंगावणे, विजय शिरसाठ, सुशांत शिरसाठ, प्रा. प्रमोद सुर्यवंशी, अजय भिंगारदिवे ,(सर),संकेत घोडके, हिराबाई भिंगारदिवे ,योगेश साठे, शकुंतला लोखंडे ,विलास साठे( सर), सोमा शिंदे ,भगवान साळवे ,वर्षा दाभाडे ,आरती बडेकर ,अशोक बागुल (सर) ,संध्या मेढे, संजय कांबळे , सुनीता घोडके, अनिकेत विधाते,त्याच प्रमाणे जिल्यातील सकल आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.