राजकिय

महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसेच्या विचाराने काम करणे हीच काँग्रेस कार्यकर्त्यांची ताकद – किरण काळे

अहमदनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. नगरकरांसाठी दहशतमुक्त, सुसंस्कृत, शांत, विकसित शहर निर्माण करण्यासाठी शहरातील काँग्रेस कार्यकर्ते गांधीजींच्या सत्य, अहिंसेच्या मार्गावर अविरतपणे काम करीत असून हीच कार्यकर्त्यांची खरी ताकद आहे, असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.

गांधी जयंती निमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेसच्या चितळे रोडवरील शिवनेरी कार्यालयामध्ये अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लाला बहादूर शास्त्री यांना देखील जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी, लाला बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून यावेळी काळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. त्यावेळी काळे बोलत होते.

किरण काळे म्हणाले की, सत्य आणि अहिंसेच्या मार्गाची ताकद मोठी आहे. गांधीजींच्या या मार्गा मुळेच देशाला स्वातंत्र्य मिळू शकले. हा मार्ग नगर शहरात दहशतमुक्त व विकसित शहर निश्चितच करू शकतो असा माझा आणि काँग्रेसचा दृढ विश्वास आहे. काँग्रेस कार्यकर्ते ज्या संयमाने आज नगरकरांसाठी लढत आहेत ती काँग्रेसची आणि महात्मा गांधींची आपल्याला शिकवण आहे. दडपशाही, द्वेष, मत्सर, मनगटशाही याच्या जोरावर ज्यांनी-ज्यांनी जनतेवर राज्य करण्याचा प्रयत्न केला त्यांचा शेवट हा नेहमी वाईट झाला आहे.

प्रेम, आपुलकी, सद्भावना ही चिरंतन टिकणारी आहे. जनसेवा करताना आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागेल. मात्र नगरकरांच्या हितासाठी सुरू केलेली लढाई ही सत्याच्या आणि अहिंसेच्या मार्गाने एक दिवस आपण आणि सर्व नगरकर नक्कीच जिंकू हे मी तुम्हाला पूर्ण आत्मविश्वासाने सांगत असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना काळे म्हणाले.

यावेळी माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, नगर युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते पाटील, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, सावेडी विभाग प्रमुख तथा शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, सांस्कृतिक काँग्रेस विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, महिला जिल्हा उपाध्यक्ष राणीताई पंडित, महिला जिल्हा उपाध्यक्ष जाहिदा शेख, अर्चना पाटोळे, पुनम वणंम ताई, शेख हलीमा, अरुणा आंबेकर, माजी नगरसेविका जरिना पठाण, शहर जिल्हा सरचिटणीस इम्रान बागवान, युवक काँग्रेस उपाध्यक्ष पै. दीपक बापू जपकर, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, शहर जिल्हा महासचिव इम्रान बागवान प्रशांत जाधव बिभीषण चव्हाण, हनीफ मोहम्मद जहागीरदार शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड शिक्षक काँग्रेसचे प्राध्यापक सुभाष ढेपे सर युवक काँग्रेस उपाध्यक्ष विनोद दिवटे, युवक काँग्रेस सहसचिव आकाश आल्हाट, संतोष जाधव, सागर जाधव, राहुल सावंत, युवक काँग्रेसचे पदाधिकारी किरण नेटके, गोरख ठाकूर आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे