देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 15 जुलै :सध्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे अनेक ग्रामीण भागातून वारकरी दिंड्यां जात आहेत. वारकऱ्यांना पायी चालत असताना येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीची कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये. अपघात होऊ नये, यासाठी अहिल्यानगर जिल्हा वाहतूक शाखेचे
पोलीस निरीक्षक महेश पाटील स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह अहिल्यानगर सोलापूर महामार्गावर घोगरगाव फाटा, रुईछत्तीशी ठिकाणी वाहतुकीचे योग्य ते नियोजन व नियमन करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा