कृषीवार्ता

पीएम किसान’ योजनेत ३१ जूलै पर्यंत ऑनलाईन ‘केवायसी’ करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन अन्यथा लाभापासून वंचित राहण्याची शक्यता जिल्ह्यात ४१ टक्के शेतकऱ्यांची ‘केवायसी’ बाकी

अहमदनगर, दि.१८ जूलै (प्रतिनिधी) – ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ घेत असलेल्या ; मात्र अद्याप ‘केवायसी’ (ग्राहकाची ओळख) न केलेल्या शेतकऱ्यांनी ३१ जूलै २०२२ पर्यंत ‘केवायसी’ ऑनलाईन करून घ्यावी. अन्यथा ‘केवायसी’ अभावी या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते. असे आवाहन ‘पीएम किसान’ योजनेचे जिल्हा समन्वयक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्याची ऑनलाईन’केवायसी’ करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम ‘मे २०२२’ पर्यंत राबविण्यात आली. या मोहीमेस ३१ जूलै २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील ४१.११ टक्के लाभार्थ्याची ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील फॉर्मर कॉर्नर (Farmer Corner) या टॅब मध्ये किंवा ‘पीएम किसान’ अॅपमध्ये ओटीपी द्वारे लाभार्थीना स्वतः केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल. ‘ग्राहक सेवा केंद्रा’वर १५ रूपयांच्या नाममात्र शुल्कात ‘केवायसी’ बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल. असे आवाहनही श्री.निचित यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे