अहिल्यानगर दि. 24 (प्रतिनिधी ) अहिल्या नगर विधानसभा मतदार संघांचे महायुती अजित पवार गटाचे विजयी उमेदवार आमदार संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी आमदार झाले आहेत. कालच नगर शहरात सर्वत्र आनंदाचा जल्लोष करण्यात आला.
आमदार संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा आमदार झाल्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने मुबंईला बोलवून घेतले आहे. त्यामुळे ते काल रात्रीच मुबंईला रवाना झाले असल्याची माहिती मिळाली असून त्यांना मंत्रीपदाची संधी मिळणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा