राजकिय

आनंदधाम परिसरात अभिषेक कळमकर यांची प्रभावी प्रचार फेरी संपन्न माहाविकास आघाडी आणि शिवसेनेचे दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती

अहिल्यानगर दि . १० – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आनंदधाम परिसरात अभिषेक कळमकर यांची भव्य प्रचार फेरी संपन्न झाली. यावेळी शिवसेनेचे नेते संभाजी कदम, विक्रम राठोड, आणि नगर शहराचे पहिले महापौर भगवान फुलसौंदर यांच्या विशेष उपस्थितीमुळे प्रचार फेरीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रचार फेरीत सहभागी झाले होते.
अभिषेक कळमकर यांनी नागरिकांना संबोधित करताना आपल्या विकासदृष्टीचा आढावा दिला आणि गेल्या काही वर्षांत अनदेखी झालेल्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, “प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत, केवळ विकासाची आश्वासने नव्हे तर त्याची अंमलबजावणी गरजेची आहे.”
यावेळी शिवसेनेचे संभाजी कदम यांनीही कळमकर यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास व्यक्त करताना त्यांच्या कामाची प्रशंसा केली. विक्रम राठोड यांनी कळमकर यांना पाठिंबा देत “खरे नेतृत्व म्हणजे जनतेच्या प्रश्नांना समाधान देणारे आणि प्रत्येक समस्येवर योग्य उपाय शोधणारे,” असे नमूद केले.
महापौर भगवान फुलसौंदर यांनी आनंदधाम परिसरातील उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना त्यांच्या अनुभवातून नागरिकांसमोर सत्तेतील महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि कळमकर यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाने समाजाचा विकास साधण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
प्रचार फेरीदरम्यान, नागरिकांनी कळमकर यांच्या योजनांबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला. वाढती बेरोजगारी, पायाभूत सुविधा, आणि परिसराचा विकास या विषयांवर चर्चा झाली. सामान्य नागरिक आणि महवीकास आघाडी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन फेरीला विशेष उत्साह दिला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक ऊर्जा पसरली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे