राजकिय

रखडलेली कामे मार्गी लावून केडगावचा विकास – महापौर रोहिणीताई शेंडगे नगरसेविका श्रीमती सुनीता कोतकर यांच्या प्रयत्नातून राधाकृष्ण कॉलनींतर्गत रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ

केडगाव (प्रतिनिधी) – केडगाव उपनगर विकासाकडे झपाट्याने वाटचाल करीत असून, या भागात मोठमोठे व्यावसायिक, उद्योजक व इंटरनॅशनल शाळा आकर्षित होत आहेत. पूर्वीच्या लेआउटनुसार दिलेल्या सुविधा व पुढचा मागचा कुठलाही विचार न करता लेआउट पाडताना पाडून त्यामधील प्लॉट सामान्यांना विकले गेले. या भागात वाढणाऱ्या वसाहतीमुळे ही बाब निदर्शनास आली. इतरांनी पुढचा मागचा विचार न करता केलेल्या चुकांचा त्रास रहिवाशांना होत असून, अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. जनता रखडलेली कामे लोकप्रतिनिधींसमोर मांडत आहे. या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न आमचे लोकप्रतिनिधी जातीने लक्ष देऊन करीत आहेत. पाठपुरावा करून समस्या कायमस्वरूपी नियोजनपूर्वक सोडविण्याचा प्रयत्न ते करीत असून, त्या मार्गी लावल्याशिवाय ते गप्प बसत नाहीत, असे प्रतिपादन महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी केले.
केडगावमधील राधाकृष्ण कॉलनी, कांदा मार्केट रोड येथे अंतर्गत रस्ता डांबरीकरण कामाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी नगरसेवक अमोल येवले, विजय पठारे, श्रीमती सुनीता कोतकर, अलका क्षेत्रे, मीरा उदागे, छाया तोगे, मीनाबाई श्राद्धे, स्वजर साठे, मीना साबळे, मीनाक्षी काटकर, स्वाती कळसाई, मुलानी भाभी, अकोलकर, संग्राम कोतकर, बबलू शिंदे, संतोष डमाळे, अविनाश मेहेर, लक्ष्मण बोरकर, जाकीर पठाण, कैलास साठे, सुरेश तोगे, अन्वर शेख, अनिकेत तोगे, राजेश गाडेकर, बाळू उदागे, दत्तात्रय बोरुडे, ऋषिकेश बाराथे, ऋषिकेश सातपुते, श्रीधर अकोलकर आदी उपस्थित होते.
महापौर शेंडगे पुढे म्हणाल्या की, अनेक दिवसांपासून या भागातील अंतर्गत रस्त्यांच्या कामाची मागणी आमच्या लोकप्रतिनिधी श्रीमती सुनीता कोतकर व सहकारी नगरसेवकांनी केली होती. रस्ता नसल्याने परिसरातील रहिवाशांना वाहतुकीत अडचण येत होती. ही अडचण आता दूर होईल. येथील नागरिकांनी विकासकामासंदर्भात आमच्या लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा केली असून, ही कामे लवकरच हाती घेऊ, असे त्यांनी सांगितले.
नगरसेविका श्रीमती सुनीता कोतकर म्हणाल्या की, महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्याकडे आम्ही विकासकामासाठी शब्द टाकण्याचा उशीर आहे, की निधी उपलब्ध होताच त्या मार्गी लावल्या जातात. यापुढे प्रभागात येणाऱ्या समस्यांचा तात्काळ निपटारा करू. प्रभाग समस्या मुक्त करण्याचा मानस पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मी त्यासाठी कटिबद्ध आहे. जनतेनेही सहकार्य करावे. जनता बरोबर असेल, तरच विकासकामे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलका क्षेत्रे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. श्रीकांत चेमटे यांनी मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे