ऑल इंडिया पँथर सेना येणाऱ्या सर्व निवडणुका लढणार: दिपकभाई केदार

अहमदनगर दि. ३० जानेवारी (प्रतिनिधी) बौद्ध,आदिवासी,मुस्लिम,शोषित,पीडित घटकांच्या सामजिक स्वातंत्र्यासाठी राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेना येणाऱ्या सर्व निवडणुका लढणार असल्याची घोषणा ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांनी नगर येथे आयोजित मेळाव्यात केली. टिळक रोडवरील माऊली मंगल कार्यालय येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे,महिला आघाडी महा.संघटक मीनाक्षीताई बोरुडे,अशोक कसबे,बीड जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवणे,नगर जिल्हा अध्यक्ष योगेश थोरात,जिल्हा कार्याध्यक्ष पवन भिंगारदिवे, जिल्हा उपाध्यक्ष अमर घोडके,शहर जिल्हा अध्यक्ष अतुल भिंगारदिवे,युवक जिल्हा अध्यक्ष सागर ठोकळ, तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले हुकुमशाही धर्मसत्ते विरोधात देशभर निळा झेंडा हातात घेऊन आंबेडकरवादी चळवलीने हजारो आंदोलने केली.नरेंद्र मोदींची अराजकतेची व्यवस्था उखडून फेकण्याची ताकद फक्त आंबेडकरवादी समूहात आहे.ही चळवळ राजकीयरित्या गतिमान करण्यासाठी “निळीशक्ती” निळा झेंडा मैदानात उतरणार असल्याची भूमिका त्यांनी भीम सैनिकासमोर मांडली. अहमदनगरचे नाव बदलन्या ऐवजी गुजराथमधील अहमदाबादचे नाव का बदलत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.आमदार गोपीचंद पडळकरांचा बोलविता धनी आरएसएस असल्याचा आरोप त्यांनी केला.सर्व कंपन्या गुजरातला,उद्योग गुजरातला पळवा आणि आम्हाला नाव बदलण्याचा उद्योग लावता काय ? अहमदनगरचे नाव बदल करण्याला पँथर सेनेचा विरोध असल्याचे ते बोलले.हिंदू राष्ट्राची जे कोणी भाषा करत असेल ज्या पद्धतीने नामदेव ढसाळ यांनी शंकराचाऱ्यांचे हाल केले होते.त्या पद्धतीने ऑल इंडिया पँथर सेना हाल केल्याशिवाय राहणार नाही.असा क्रांतिकारी इशारा त्यांनी देत स्वभिमानाने सुरू असलेल्या ऑल इंडिया पँथर सेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिध्द निवेदक उद्धव काळापहाड यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा अध्यक्ष योगेश थोरात यांनी केले.मेळाव्यास कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.