राजकिय

जनते पर्यंत पोहोचा, मागील वेळे पेक्षा मनपात दोन जागा निश्चित जास्त मिळतील : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शहर प्रमुख किरण काळेंच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट, शिवसैनिकांशी साधला संवाद

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर : संघटना आईसारखे असते, आईवर कुणी नाराज होत नाही, नव्या जुन्यांनी एकत्र आले पाहिजे. जो चालेल, धावेल त्याची संघटना हे लक्षात ठेवले पाहिजे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रभागापर्यंत,जनतेपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. मागील वेळेपेक्षा दोन जागा आपल्याला निश्चित जास्त मिळतील, असा विश्वास राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त करून प्रशासक काळात सत्ताधारी विरोधकांनी कशा पद्धतीने महापालिका लुटली हे जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन केले.
खाजगी दौऱ्यावर आले असता दानवे यांनी अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यांचा यावेळी शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख पप्पू भाले, दीपक भोसले, विलास उबाळे, सुनील त्रिपाठी, रावजी नांगरे, विकेश गुंदेचा, संजय वल्लाकट्टी, राजू औटी, सुनील भोसले, आनंद राठोड, गौरव ढोणे, महावीर मुथा, किशोर वाघ, सचिन शेंडगे, सुजय लांडे, ऋतुराज आमले, मिलन सिंग, शंकर आव्हाड, किशोर कोतकर, गणेश आपरे, विकास भिंगारदिवे, मयूर भिंगारदिवे, जयराम आखाडे, भगवान शेंडे, दत्ता गायकवाड, दीपक काकडे, सिद्धांत भिंगारदिवे, पोपट लोंढे, भगवान शेंडे, रोहिदास भालेराव, विनोद शिरसाट, सचिन भालेराव, सचिन कापुरे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मविआ पदाधिकाऱ्यांची उपस्थिती :
यावेळी शहर महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी अंबादास दानवे यांची भेट घेतली. महाविकास आघाडीचे ब्लॉक काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चूडीवाला, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषा भगत, महिला उपाध्यक्ष शैलाताई लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर कार्यकारी अध्यक्ष अनिकेत कराळे, रिपब्लिकन एसआरपी टायगर संघटनेचे जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट आदी उपस्थित होते.
अंबादास दानवे म्हणाले की, आपल्यातून अनेक जण दुसऱ्या पक्षात गेले. पण संघटना ही काही थांबत नाही. रेल्वे ज्या पद्धतीने असते तिच्या डब्यातून अनेक जण उतरतात, तर अनेक जण चढत ही असतात. काहीजण गेले म्हणजे नव्याने कोणी तरी येत असतं हे लक्षात ठेवावं. त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा आता नव्या जुन्याची सांगड घालून पक्ष संघटना अधिक बळकट करायची आहे. दानवे म्हणाले, आजच्या काळामध्ये जो चालेल, धावेल, त्याची ही संघटना असेल.
स्व. अनिल भैय्यांची आजही आठवण :
दिवंगत उपनेते अनिल राठोड यांनी या नगर शहरामध्ये नेतृत्व केलं. ज्या वेळेला मराठवाड्यात नामांतराच्या आंदोलना नंतर अटक झालेल्या शिवसैनिकांना विसापूरला आणले होते. त्यांना राठोड मदत केली होती. नगरमध्ये पंचवीस वर्ष त्यांनी जनतेची सेवा केली. आजही त्यांची आठवण आल्या शिवाय राहत नाही.
प्रत्येक प्रभागात जा :
आम्ही सुद्धा संघर्षातून संभाजीनगर मध्ये लढलो. प्रत्येका पर्यंत पोहोचलो. त्याच पद्धतीने तुम्ही पण प्रत्येक भागात, गल्ली जा. सगळ्या ठिकाणी तुम्ही पोहोचा. जनतेमध्ये जा. जनता ही नेहमीच आपल्याबरोबर असते. यंत्रणा उभी करा. सामान्य माणसा पर्यंत पोहोचले पोहोचा. प्रत्येक बूथ बांधा. पदाधिकारी नियुक्त करा. निश्चितपणे संघटना उभी राहिल्या शिवाय राहणार नाही.
आम्ही नाही शिवसैनिक मालक :
संघटनेमध्ये काम करताना सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. ज्यांना जायचं ते गेले. पण संघटना काही थांबली नाही. आपण मालक नाही, शिवसैनिक हा मालक आहे, ही भावना सातत्याने लक्षात ठेवा, असे दानवे यांनी यावेळी सांगितले.
ते ही शिवसेनेच्या संपर्कात :
नगर जिल्ह्यातून अनेक जण इतर पक्षांमध्ये गेले. नगरसेवक असो पदाधिकारी असो. ते आज ही शिवसेनेच्या संपर्का मध्ये आहेत. वारं केव्हाही, कस ही फिरत हे लक्षात असू द्या, असा टोला यावेळी त्यांनी लगावला. त्यामुळे भविष्यात गळालेले काही चेहरे परत शिवसेनेच्या गळाला लागणार काय आशा चर्चेला तोंड फुटले आहे.
त्यांच्या कारभाराची पोलखोल करा :
महानगरपालिकेमध्ये विरोधकांची पण सत्ता होती. प्रशासकाच्या माध्यमातून सत्ताधारी महायुतीच्या हातातच मनपाचा रिमोट कंट्रोल आहे. यांचा हरामाचा पैसा होता. त्यांनी त्या सत्तेचा वापर कशा पद्धतीने केला. हे जनतेला सांगा. त्यांनी कशी महानगरपालिका लुटली हे सांगा. आपण काय करणार हे नंतर सांगू. पण या ठिकाणी रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज यासाठी कशा पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी जनतेला वेठीस धरलं हे सर्व जनते पर्यंत पोहोचवा. प्रत्येकाने मी जिंकणारच हा निर्धार करून जोरदार कामाला लागा, असे आवाहन यावेळी दानवे यांनी केले.
मनपावर भगवा फडकवू :
यावेळी किरण काळे म्हणाले, आजही नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेची संघटना उभी आहे. संघटनेला अधिक बळकट करण्याचं काम करायचं आहे. शिवसेना हा नगरकरांचा श्वास असून ती कधीच संपू शकत नाही. सगळ्यांना सोबत घेत आगामी काळामध्ये महानगरपालिकेमध्ये सत्ता आणण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करू शकतो याची आत्तापासूनच शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. मनपावर शिवसेना नक्की भगवा फडकवेल, असे काळे यावेळी म्हणाले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे