अहमदनगर दि. 3 सप्टेंबर (प्रतिनिधी ) हा मेळावा कोणताही खुलासा करण्यासाठी नसून संविधानाचा गौरव करण्यासाठी संविधान सन्मान मेळावा आयोजित केला असल्याचे मत आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरात सहकार सभागृह येथे आयोजित संविधान सन्मान मेळाव्या निमित्त केले. यावेळी तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्री म्हूणन संधी मिळाल्याबद्दल नामदार रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी बोलतांना आमदार जगताप म्हणाले, मेळावा हे एक निमित्त आहे, आठवले साहेबांचा सन्मान नगर शहरात करायचाच होता, आणि तो योग संविधान सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने जुळून आला. आठवले साहेब व प्रा. कवाडे सर यांचा उपयोग समाजाच्या विकासाठी कसा करता येईल याबाबत आपण सर्वानी विचार करणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सम्पूर्ण देशाचे आदराचे स्थान असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे, आरपीआयचे राजाभाऊ कापसे, सुवेंद्र थोरात, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव राष्ट्रवादीचे प्रा. मानिक विधाते, जेष्ठ नेते अशोक गायकवाड, जेष्ठ नेते विजय भांबळ, विजय जगताप,संभाजी भिंगारदिवे कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे, निमंत्रक आरपीआय (आठवले ) गटाचे उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध साळवे, प्रा. जयंत गायकवाड, नितीन कसबेकर, महेश भोसले, नितीन साळवे,निखिल साळवे, राहुल साळवे, सुरेश भिंगारदिवे, विनोद भिंगारदिवे,विनोद साळवे,पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला प्रमुख गौतमी भिंगारदिवे, आरपीआय च्या जिल्हा अध्यक्ष जयाताई गायकवाड त्याचप्रमाणे फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा