राजकिय
महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्यास एकवटला समस्त व्यापारी वर्ग सेवावृत्तीने फक्त आणि फक्त मातृभूमी नगरसाठीच पूर्णवेळ काम करण्याची माझी भूमिका : आ.संग्राम जगताप


‘मेरेपास भगवान का दिया सबकुछ है…’ त्यामुळे सेवावृत्तीने फक्त आणि फक्त आपल्या मातृभूमीसाठीच पूर्णवेळ काम करण्याची माझी भूमिका आहे. राज्याच्या नकाश्यावर विकसित नगर शहर म्हुणुन वेगळी ओळख निर्माण करून भविष्यात आपले शहर हे मेट्रोसिटी करायचे आहे. यासाठी सर्वांची साथ मला हवी आहे. अहिल्यानगर मधील तब्बल ५३ व्यापारी संघटनांनी माल पाठींबा दिल्याबद्दल मी सर्वंच्या ऋणात राहील, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी केले.
यावेळी सर्व संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अरुण जगताप, उमेदवार संग्राम जगताप, उद्योजक नरेंद्र फिरोदिया. संतोष बोथरा. डाळ मंडई आडतेबाजार मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गांधी, सराफ संघटनेचे अध्यक्ष सुभाष कायगावकर, इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष अरविंद गुंदेचा, जॉग्री असोसिएशनचे अध्यक्ष राजू बोथरा, मिरची मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गोपाळ मणियार, आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय चोपडा, क्रीडाईचे अध्यक्ष अमित मुथा, भाजी फळ फूल व्यापारी असोसिएशनचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक लाटे, उद्योजक व रामकृष्ण क्रेडिट सोसायटीचे चेअरमन श्रीगोपाल धूत, हॉटेल व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पंजाबी, अण्णासाहेब मुनोत, अनिल पोखरणा, अमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, कापड बाजार असोसिएशनचे अध्यक्ष श्याम देडगावकर, आदेश चंगेडीया, राजेश भंडारी, सिंधी समाजचे अध्यक्ष महेश मध्यन, सुरेश हिरानंदानी, प्रकाश गांधी, सावडी उपनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, अविनाश घुले, गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संतोष बोरा, जय रंगलानी, ठाकूर नवलानी, राजेंद्र चोपडा, पोपट भंडारी, अशोक भंडारी, डॉ. विजय भंडारी, भाजपाचे नेते सुवेंद्र गांधी आदींसह उपस्थित होते.