राजकिय

आमदार बच्चू कडू यांनी लगावला मुख्यमंत्री शिंदे यांना टोला ’चिन्ह भेटलं म्हणजे माणसं निवडून येतात, असं नाही’

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षांसमोर सुरु असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय अखेर काल जाहीर केला. अध्य्क्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांचा गटचं अधिकृत शिवसेना असल्यावर शिक्कामोर्तब केलं. यामुळे शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार नाहीत. हे स्पष्ट झालं. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
यावर आता आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला टोला लगावला आहे. माध्यमांशी बोलतांना बच्चू कडू म्हणाले’चिन्ह भेटलं म्हणजे माणसं निवडून येतात, असं नाही’
,’एकनाथ शिंदेंकडे ४० आमदार असल्यानं शिवसेना त्यांचीच असल्याचं स्पष्ट झालं आहे. हा निकाल खोटा असेल, तर ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयात जाता येतं. पण, न्यायालयाच्या निकालावर आक्षेप घेतल्यास मग कठीण आहे.’
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे