सामाजिक

नालेगाव व नेप्ती शिवारातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे

अहमदनगर दि. ७ सप्टेंबर (प्रतिनिधी)- नालेगाव व नेप्ती शिवारातील शेतकऱ्यांना शेतात येण्या जाण्यासाठी रस्ता नसून जो जुना राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ व नवीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एन एच ६१ शेतीपासून १२ ते १५ फूट अंतर खोलीचे असून येण्या जाण्यासाठी रस्ता नसून शेतकऱ्यांना लवकरात लवकर रस्ता बनवून देण्यात यावा या मागणीसाठी अनेक वेळा निवेदने आंदोलने करून देखील रस्ता अद्यापही शेतकऱ्यांना उपलब्ध झाला नसल्याचे निषेधार्थ अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना छावा संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई सांगळे, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे सचिव दत्ताभाऊ वामन, रावसाहेब काळे, अखिल विश्व वारकरी परिषदेचे साहेबराव पाचारणे, अहमदनगर जिल्हा भिल्ल असोसिएशनचे सुनील ठाकरे, अहमदनगर जिल्हा शेतकरी विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष विलास कराळे, शिवप्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष बापू ठाणगे, सुनील चितळे, सुनील सकट, योगेश पवार, नितीन शेंडे, पंकज दातरंगे, शरद दातरंगे, गणेश हिंगे, स्वप्नील खोमणे, दत्तू हिंगे, वैभव खोमणे, हरिभाऊ जपकर आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी पूर्वी शिव रस्ता होता. तरी बाकीच्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना शेतात जाण्या येण्यासाठी जो प्रशासनाने रस्ता दिलेला आहे. त्या पद्धतीने शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाणे येण्यासाठी रस्ता देण्यात यावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून लवकरात लवकर शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता तयार करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे