वाल्मिक तात्या निकाळजे यांना राज्यस्तरीय राजर्षी छ. शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार प्रदान!

कोल्हापूर दि. २८ जून (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष, राज्याचे जेष्ठ मानव अधिकार विशेषज्ञ व कार्यकर्ते, दलित, आदिवासी, भटके विमुक्तांचे लाडके,अभ्यासू व झुंजार लढाऊ नेते, राजर्षी शाहू ग्रामीण विकास प्रकल्प या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍड.वाल्मिक (तात्या) निकाळजे यांच्या 42 वर्षांच्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सक्रिय योगदाना बद्दल, लढाईबद्दल व समाज परिवर्तना बद्दल राजर्षी छ.शाहू महाराज जयंती निमित्त आणि सामाजिक न्याय दिना निमित्त राज्यातील 100 सामाजिक संस्था संघटनांची शिखर संघटना विवेक विचारमंच महाराष्ट्र, शिवाजी विद्यापीठ आणि राज्यातील सहयोगी संस्था संघटना यांच्या वतीने दिला जाणारा राज्यातील मानाचा व प्रतिषठेचा राज्यस्तरीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आयोजित सामाजिक न्याय परिषदेत नुकताच कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार, राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश भाऊ खाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास संस्था (बार्टी) चे महासंचालक सुनिल वारे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.डी.टी.शिर्के, प्र. कुलगुरू प्रा. डॉ.पी.एस.पाटील, विवेक विचार मंच चे प्रदेशाध्यक्ष संविधान तज्ञ प्रदीप दादा रावत या मान्यवरांच्या शुभहस्ते व माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, समरसता गतिविधीचे राष्ट्रीय कार्यकारी मंडळ सदस्य प्रा.डॉ.रमेशजी पांडव, समरसता गतिविधीचे क्षेत्रीय संयोजक निलेशजी गद्रे, बहुजन रयत परिषद महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल साळुंखे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव जाधव (जालना) व नितीन मोरे (मुंबई), धुळे जिल्हाध्यक्ष प्रदीप पानपाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष विकास औसरमल, विवेक विचार मंच चे राज्य समन्वयक सागर शिंदे, मराठवाडा समन्वयक ऋषिकेश सकनूर, अरुण कराड, मुंबई विभाग समन्वयक अशोक तिडके, फुले आंबेडकरी चळवळीचे नेते विजय गव्हाळे, प्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी तोफखाने, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सिद्धार्थ शिंदे, विद्यापीठ सिनेट सदस्य रतन शिंदे अनेक प्राध्यापकांसह राज्याच्या सर्व जिल्ह्यातून आलेल्या चळवळीच्या अग्रेसर व सक्रिय शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या सभागृहात प्रचंड टाळयांच्या कडकडाटात कोल्हापूर येथे हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी वाल्मिक तात्या निकाळजे यांचा मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन व हृद्य सत्कार करून त्यांना कुटुंबासह पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपाचे दिग्विजयी नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी व्हिडीओ संदेश पाठवून परिषदेस व पुरस्कार्थीस हार्दिक शुभेच्छा दिल्या!
यादरम्यान वाल्मिक तात्या निकाळजे यांच्या 42 वर्षांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याचा व चळवळीतील अथक कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा घेणारी चित्रफित दाखवण्यात आली. पुरस्कार प्रदान केल्या नंतर सर्व प्रमुख मान्यवरांनी वाल्मिक तात्या निकाळजे यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी लोकशाही जागर मंच पूणे, संत चोखामेळा अध्यासन केंद्र पूणे, एक वारी समतेची महाराष्ट्र, सुराज्य सर्वांगीण विकास संघ, जन संघर्ष समिती नागपूर, लोक विकास संस्था, जनसेवा फाउंडेशन, भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र, भीमशक्ती मुंबई, जयभीम आर्मी महाराष्ट्र, दिशा ज्योत फौंडेशन, बिरसा मुंडा विचार मंच, जिव्हाळा संघटना, पीपल्स डेमोक्राटीक मूव्हमेन्ट, समता अधिकार आंदोलन इत्यादी सहयोगी संस्था व संघटनांचे शेकडो प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. वाल्मिक तात्या निकाळजे यांच्या कार्याचे मान्यवरांसह सर्वांनी खूप कौतुक केले.
हा राज्यस्तरीय प्रतिषठेचा व मानाचा पुरस्कार मिळाल्या बद्दल वाल्मिक तात्या निकाळजे यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा प्रचंड वर्षाव होत आहे.