कौतुकास्पद
“जय जवान!जय किसान!! जय संविधान!!!” या मूलमंत्रावर आधारित “संविधान प्रतिष्ठानच्या” वतीने मानवतेच्या हेतूने ऊसतोड मजुरांना उबदार कपड्यांचे वाटप! जिल्ह्यातील पहिला स्तुत्य उपक्रम!



उदा. मानवांना अपेक्षित असलेला भारत देश आपण घडवू शकलो का? स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, आणि मानवता या मूल्यांवर आधारित समाजाची निर्मिती आपण करू शकलो का? जात धर्म पंथ संप्रदाय वंश या पलीकडे जाऊन भारतीय संविधानाने आपल्याला नवीन दृष्टी दिली ती नवी दृष्टी आपण अंगीकारली आहे का? आज तरी या सर्व प्रश्नांची उत्तरे आपणाकडे नाहीत. यावेळी बोलताना जाधव म्हणाले ज्या दानशूर लोकांमुळे आम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगणाऱ्या ऊसतोड मजुरांना थंडीच्या दिवसात उबदार कपडे देऊ शकलो. अशा दानशूर लोकांना दीर्घ आयुष्य लाभो अशी मंगल कामना त्यांनी यावेळी केली. जिल्ह्यातील या स्तुत्य उपक्रमाबद्दल ऊसतोड कामगारांनी कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की,आमच्या वीस वर्षाच्या काळात अशा प्रकारची माणुसकी आणि आपलेपणा आम्ही पहिल्यांदाच अनुभवत आहोत. आम्ही आमच्या मुलांना नक्कीच चांगले शिक्षण देऊ संविधान समजून घेण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो यावेळी बाबासाहेब बटुळे, राजू रोकडे, गोवर्धन बटुळे, अशोक कराड, धर्मराज बटुळे, शितल रोकडे,विशाल कराड, रंजना बटुळे, नितीन कराड, मंदा कराड,उषा बटुळे, आधी ऊसतोड मजुरांना उबदार कपड्याचे वाटप करण्यात आले.