प्रशासकिय

अंमली पदार्थ विरोध दिन, व सायबर गुन्हेबाबत स्वातंत्र्य दिनानिमित्त अहमदनगर महाविद्यालय येथे सायबर गुन्हे शाखेने केली जनजागृती

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 20 ऑगस्ट : 79 वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारताचा राष्ट्रीय सण  म्हणून नुकताच साजरा झाला. स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व सरकारी कार्यालय त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्था त्याचप्रमाणे विविध सामाजिक संघटना तिरंगा फडकून त्याला सलामी देत स्वातंत्र्य दिन भारतभर साजरा होत असतो.
अहिल्या नगर शहरातील सायबर क्राईमने अंमली पदार्थ विरोधी दिन सप्ताह निमित्त अहमदनगर महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ त्याचप्रमाणे सायबर गुन्हे कसे घडतात.याबाबत जनजागृती केल्याची विशेष मोहीम राबवली. यावेळीअहमदनगर महाविद्यालयातील एनसीसी विध्यार्थी यांना सायबर गुन्हे कसे घडतात, गुन्हेगार कोण कोणत्या पद्धतीने आपली वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करतात, याबाबत सायबर गुन्हे शाखेने अनेक उदाहरणे देत आपली फसवणूक होऊ नये, म्हणून आपण स्वतः काय काय काळजी घेतली पाहिजे. याबाबत मार्गदर्शन केले. तसेच अंमली पदार्थामुळे होणारे परिणाम व त्यावर प्रतिबंधाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी एनडीपीएस कायद्याची आयटी ॲक्ट याबाबत माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे प्रत्येक कलमाला किती शिक्षा आहे हे देखील मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी 60 ते 70 एनसीसी कंडेट व त्यांचे प्रशिक्षक श्री. जाधव सर हजर होते.
सदर कार्यक्रम अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबर्मे, यांच्या मार्गदर्शनानुसार सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम,पोलीस उप निरीक्षक सुदाम काकडे, पोलीस नाईक अभिजित अरकल यांनी केला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे