सामाजिक

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीही निलक्रांती चौक महापालिकेच्या सफाई पासून वंचित

अहमदनगर दि. १५ ऑगस्ट (प्रतिनिधी ) १५ ऑगस्ट अर्थात् भारतीयांचा स्वातंत्र्य दिन,आपल्या देशाचा राष्ट्रीय सण सामाजिक तिरंगा ध्वजास अभिवादन करून साजरा केला जातो.प्रत्येक चौकातून साफ सफाई केली जाते.
फुले,शाहू, आबेडकरी विचाराला मानणाऱ्या निलक्रांती चौक मात्र स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीही महानगर पालिकेच्या सफाई पासून वंचित असल्याची वास्तव बाब समोर आली आहे. इतर दिवशी तर सफाई कामगार चौकात झाडून  घेतच नाहीत. परंतु राष्ट्रीय सणाच्या दिवशीही चौकात कचऱ्याचे ढीग असणे ही निश्चितच दुर्दैवी बाब आहे. याबाबत निलक्रांती चौक,गौतमनगर या वार्डाचे विद्यमान नगरसेवक, वार्डाचे केअर टेकर व सफाई कर्मचारी यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे