राजकिय

आगामी निवडणुकांमध्ये नगरसेवक आमदार खासदार ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद परिषद सदस्य निवडून आणणार:दिपकभाऊ निकाळजे

कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश व मेळावा संपन्न

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पार्टी येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये नगरसेवक आमदार खासदार ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद परिषद सदस्य निवडून आणून ग्रामीण भागामधील स्थानिक प्रश्नांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सोडवणार प्रयत्न करत राहणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांनी केले.ते दोन आंबेडकर स्मारक येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला नगरला आले असताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले
27जुलै 1990 ला पक्षाची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन करण्यात आली .
मी पक्षप्रवेश सन 2002 केला त्यानंतर सन 2019 रोजी मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाची जबाबदारी स्वीकारली पक्षाची बांधणी व संघटन ठाणे कल्याण या ठिकाणी पक्षाची शाखा तयार केली.
covid-19 महामारी मध्ये पक्षाचे काम काही दिवस बंद करण्यात आले. त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे चेन्नई ते विशाखापटनम तसेच पूर्ण देशामध्ये महाराष्ट्र तसेच प्रत्येक जिल्ह्याला जाऊन पक्षाची बांधणी व संघटन करण्यास सुरुवात करण्यात आली.
वर्धा मधील बाबासाहेब आंबेडकर पुतळा संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गाव तिथे शाखा स्थापन करणार आहे. पक्षाच्यावतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर चळवळ विचारांची मना मना पर्यंत घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करणार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे महत्व तसेच मूलभूत हक्क काय आहेत.हे ग्रामीण तसेच शहरी भागापर्यंत लोकांच्या मनापर्यंत पोचवण्याचं कार्य करणार आहे .
मुंबई या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी विद्यार्थ्यांना पोलिसांकडून लाठी रिचार्ज करण्यात आला होता.
या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या पक्षाचे अन्याय-अत्याचार याच्या विरोधामध्ये आवाज उठून न्याय मिळवून देण्याचं प्रयत्न करणार आहे सर्व जाती धर्माचे लोक पक्षांमध्ये समाविष्ट करून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करत राहणार आहे .
समाज सुधारण्यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाचा निधी उपलब्ध करण्यासाठी नेहमी पुढाकार राहील दलित बांधवावर इतर समाजावर अन्याय झाल्यास कदापि खपवून घेतले जाणार नाही जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष खंबीर आहे पत्रकारांशी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे प्रतिक्रिया यांनी दिली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे