बिपीनदादा कोल्हे यांना साखर उद्योगातील भरीव योगदानाबद्दल देशपातळीवरील जीवन गौरव पुरस्कार

कोपरगाव:- दि ४ डिसे.
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त बिपीनदादा कोल्हे यांना साखर उद्योगातील भरीव योगदानाबद्दल देशपातळीवर कार्यरत असलेल्या शुगरकेन ब्रिडींग इन्स्टीटयूट कोईमतूर अंतर्गत सोसायटी फॉर शुगरकेन रिसर्च अँड डेव्हलपमेंट संस्थेने प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार शुगरकेन ब्रिडींग इन्स्टीट्युट संस्थेचे माजी संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एन.विजयन नायर यांच्या हस्ते देऊन सन्मान केला आहे. सदरचा पुरस्कार बिपिनदादा कोल्हे यांनी स्व. शंकरराव कोल्हे व सभासद शेतकऱ्यांच्या चरणी समर्पित केला आहे.
या संस्थेच्या संचालिका डॉ. जी. हेमप्रभा याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, पुढच्या वर्षापासून सहकारी साखर उद्योगात माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांच्या नावे प्रतिष्ठेचा देश पातळीवर पुरस्कार या संस्थेचेवतीने दिला जाणार आहे.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने साखर उत्पादनांबरोबरच आसवनी त्यावरील विविध रासायनीक उपपदार्थांची निर्मीती करून सहवीज निर्मीती, बायोगॅस, उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मीती करून देशपातळीवर नावलौकीक मिळविला आहे.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली बिपीनदादा कोल्हे यांनी कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांचे उसाचे प्रति हेक्टरी बसउत्पादन वाढविण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याबाबत धडक कृती विकास गडकार्यक्रम राबविले. उस जसंशोधनातील शिखर संस्था असलेल्या शुगरकेन ब्रिडींग इन्स्टिट्यूट सोसायटी कोईमतूर अंतर्गत उसाच्या विविध विकसीत जातीचे उस बेणे देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभदायक ठरते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री. बिपीन कोल्हे यांनी ब्राझील मध्ये १५% उतारा मिळवला जातो. भारतात त्वरित
कमीतकमी श्रम , वेळ , खर्चात बचत करणारे बियाणे तयार करावे. आम्ही विशेष परिश्रम घेत आहोत असल्याचे त्यांनी सांगितले.