राजकिय

सतत जनतेच्या संपर्कात राहून प्रश्न सोडविण्याचे काम केले: आमदार संग्राम जगताप आमदार संग्राम जगताप यांच्या विकास यात्रेला मिळतोय नागरिकांचा मोठा प्रतिसाद

अहिल्यानगर दि. 31 ऑक्टोबर (प्रतिनिधी )सतत जनतेच्या संपर्कात राहून प्रश्न सोडविण्याचे काम केले असल्यामुळे ऋणानुबंध निर्माण झाले असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतरुपी आशीर्वाद घेण्यासाठी थेट जनतेच्या दारात जात असताना नागरिक मोठ्या उत्साहात स्वागत करताना पाहावयास मिळत आहे, जनतेचे माझ्यावर असलेले प्रेम पाहून मन भारावून गेलो, शहरात गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामातून नागरिकांचा विश्वास संपादन केला असल्यामुळे नागरिक, महिला ठिकठिकाणी मोठ्या संख्येने घराबाहेर येत औक्षण करत पेढे खाऊ घालत आहे, या माध्यमातून मी केलेल्या कामाची पावतीच मला मिळत आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार संग्राम जगताप यांनी जाधव मळा सरोदे कॉलनी हडको दातरंगे मळा परिसरातील नागरिकांची विकास यात्रेच्या माध्यमातून संवादसाधला यावेळी माजी नगरसेवक दगडू मामा पवार, प्रा. अरविंद शिंदे, युवराज शिंदे, गणेश दातरंगे, हरिभाऊ येलदंडी, काका शेळके, वैभव वाघ, शुभम दातरंगे, दादा पांडुळे, भरत जाधव, योगेश जाधव, सनी जाधव, राजू कोकणे, सनी आगरकर, शरद दातरंगे, मनोज आंबेकर, अरुण कटके, संतोष लांडे, प्रथमेश आगरकर, साहिल शिंदे, अनमोल वांढेकर, दीपक गुंडू, सचिन मुदगल, अंकुश बुरा, भाऊ पुंड, गौरव बोरुडे, पप्पू शिंदे, उद्धव म्हस्के, सनी शिंदे, भैय्या लेंडकर, रवी कापसे, स्वप्निल अडसूळ, स्वप्निल सुडके, प्रशांत बेल्हेकर, करण नागापुरे, रोहन शिरसाट, अनिकेत चव्हाण, जुबेर शेख, राकेश भंडारी, शुभम बुरा, योगेश झिंजे, सागर कदम, राम वाघ, राजू पाथरे, गौरव खंडागळे, चेतन शेलार आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे