राजकिय

बहुजन विकास कृती समितीच्या वतीने वरवंडीत शिवजयंती साजरी

राहुरी / प्रतिनिधी — तालुक्यातील वरवंडी येथे बहुजन विकास कृती समितीच्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची 392 वी जयंती बुद्धविहारात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला सरपंच भाऊसाहेब कोळेकर यांनी पुष्पहार अर्पण केला. ज्येष्ठ नागरिक मधुकर भालेराव, ग्रामपंचायत सदस्य सलीम भाई शेख, राजू पवार, दिगंबर ताकटे, संजय अडसुरे, कैलास पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात जालिंदर अडसुरे, कोंडीराम बाचकर, शरद ढगे,अरुण नन्नवरे आदींनी शिवजयंतीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
कुणाल भालेराव,सुशांत भालेराव, ओम भालेराव, वेदांत शिंदे,स्वरा भालेराव, प्रथमेश जाधव, सुजय भालेराव, संग्राम भालेराव आदी चिमुकल्या मुलांनी शिवाजीराजांच्या जीवनावर भाषण केले.
प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार आर. आर. जाधव यांनी शिवचरित्र पर व्याख्यान करून शिवरायांच्या शौर्याच्या इतिहासाची रोमहर्षक जाणीव करून दिली. याप्रसंगी सुनील पवार, नारायण शिंदे, राजू पवार,प्रियंका जाधव, राधिका शिंदे, ऋषीकेश भालेराव, गोरक्षनाथ अक्षय भालेराव, भालेराव छोटू पवार, गोकुळ पवार, सचिन भालेराव, आबा भालेराव, अविनाश पवार, सतीश आढाव आदींसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ हजर होते. याप्रसंगी उपसरपंच ग्रामपंचायत वरवंडी शकुंतला विश्वनाथ पवार यांनी बुद्ध विहारास भिंतीवरील घड्याळ दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बामसेफचे प्रचारक संजय संसारे यांनी केले, रवींद्र भालेराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व सुनील भालेराव यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे