न्यायालयीन

मध्यस्थी प्रक्रिया ही लोकाभिमुख व गतिशील होणे गरजेचे आहे – मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर – श्री.सुधाकर वे.यार्लगड्डा

अहमदनगर (प्रतिनिधी)
मध्यस्थी प्रक्रिया ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ती लोकाभिमुख व गतिशील होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रभाग निहाय नगरसेवकांना मध्यस्थी प्रक्रियेचे महत्त्व, फायदे याबद्दल सजग व जागरूक करून त्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत मध्यस्थी प्रक्रिया पोहोचवण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुढाकार घ्यावा, असे मत मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर – श्री.सुधाकर वे.यार्लगड्डा यांनी व्यक्त केले.
मा. मुख्य मध्यस्थी केंद्र, मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर बार असोसिएशन,अहमदनगर व सेंट्रल बार असोसिएशन, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यस्थी प्रक्रियाबाबत जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दि.16/09/2022 रोजी करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.श्री.सुधाकर वे.यार्लगड्डा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, अहमदनगर हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना जेव्हा प्रशिक्षित मध्यस्थ द्वारे मध्यस्थी प्रक्रिया कार्यान्वित केली जाते, तेव्हा तो आवश्यकतेनुसार प्रत्येक पक्षासह वैयक्तिक बैठका आणि दोन्ही पक्षांसोबत संयुक्त बैठका पार पाडतो. मध्यस्थ माहितीची गोपनीयता राखतो. मध्यस्थ हा प्रत्येक पक्षाचे हित समजावून घेतो.तो एका पक्षाचा प्रस्ताव दुसऱ्या पक्षाला कळवतो आणि पक्षांमध्ये वाटाघाटी द्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो. संबंधित पक्षकारांचा करार न्यायालयाद्वारे मंजूर केला जातो आणि त्याविरुद्ध कोणतेही अपील करता येत नाही. अशा प्रकारे पक्षांचे नातेवाईक किंवा जातीचे प्रमुख यांनी केलेली मध्यस्थी आणि प्रशिक्षित मध्यस्थ यांच्यातील मध्यस्थी मध्ये फरक आहे.
या कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीमती भाग्यश्री का.पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर यांनी केली. त्यामध्ये त्यांनी मध्यस्थी प्रक्रियेमध्ये पैसा, वेळ व मानसिक तणाव कसा वाचतो हे समजावून सांगितले. मध्यस्थी प्रक्रियेमध्ये कोणाची हार किंवा कोणाची जीत होत नाही, त्यामुळे दोन्ही पक्षांना समाधान मिळते यावर भाष्य केले. अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष, श्री.अनिल सरोदे यांनी आपल्या मार्गदर्शनात मध्यस्थीच्या माध्यमातून लवकरात लवकर खटले निकाली कसे काढता येतील हे सांगितले. तसेच मध्यस्थीचे फायदे , तोटे जाणून घेणे हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे असे सांगितले. सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री.के.एम. देशपांडे यांनी वादी आणि प्रतिवादी या दोघांना प्रकरणाचे खरे स्वरूप माहीत असते. त्यामुळे त्यांनी मध्यस्थी प्रक्रियेद्वारे आपले वाद मिटवणे हिताचे असते असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड.श्री.कौस्तुभ कुलकर्णी यांनी केले व आभार प्रदर्शन अ‍ॅड. श्रीमती अनुराधा येवले-आठरे यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड.श्री. एस. के. पाटील हे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात नालसा गीताने करण्यात आली. सदर कार्यक्रमात मध्यस्थ विधीज्ञ, पॅनल विधीज्ञ, लॉ कॉलेजचे विद्यार्थी , इन्शुरन्स कंपनी, बँका यांचे अधिकारी व पक्षकार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा न्यायालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व संगणक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे