सामाजिक

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच देशाचे अखंडत्व टिकवू शकते – सुनिल क्षेत्रे

अहमदनगर दि. 6 डिसेंबर (प्रतिनिधी) : आज देशामध्ये परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. आपल्या राजकीय अजेंड्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा डाव काही प्रवृत्ती राबवित आहेत. मात्र देशाला स्थिर ठेवण्याची ताकद देशाच्या संविधानामध्ये आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच देशाचे अखंडत्व टिकवू शकते, असे प्रतिपादन मागासवर्गीय काँग्रेस विभागाचे नेते सुनिल क्षेत्रे यांनी केले आहे.

भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते तथा शिवसेना जिल्हा समन्वयक अशोकराव गायकवाड, माजी नगरसेवक तथा ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर अध्यक्ष चंद्रकांत उजागरे, साफसफाई कामगार विभाग शहर जिल्हाध्यक्ष गणेश चव्हाण, शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, काँग्रेस अपंग सहायता विभाग शहर जिल्हाध्यक्ष सोफियान रंगरेज, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, सांस्कृतिक काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. बापु चंदनशिवे, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड इंजि. सुजित क्षेत्रे, प्रशांत जाधव, गौरव घोरपडे, बिबीशन चव्हाण, आदी उपस्थित होते.

यावेळी क्षेत्रे म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” असा संदेश समाजाला दिला. शिक्षणाच्या बाबतीत आपण पुढे आलो आहोत. मात्र आज देशामध्ये ज्या पद्धतीने देश तोडण्याच्या कृती सुरू आहेत या कृतींच्या विरोधात लढण्यासाठी त्यांच्या विचारांप्रमाणे संघटित होऊन संघर्ष करण्यासाठी सज्ज होण्याची गरज आहे. काही लोकांना देशाच संविधान नको आहे. त्यांना धर्मा-धर्मात, जाती-जातीत तणाव निर्माण करायचा आहे.

अशा वेळी भारतीय संविधानाने धर्मनिरपेक्षतेचा दिलेला विचारच देशाचे अखंडत्व बाधित करणाऱ्यांना रोखू शकतो. त्यामुळेच संविधानाचा जागर करण्याची पुन्हा एकदा वेळ आलेली आहे. शांतता आणि बंधुतेचा विचार घेऊन समाजविघातक प्रवृत्तींपासून समाजाला वाचण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी क्षेत्रे यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केल्यानंतर त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे