सामाजिक

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची स्वप्न साकार करण्यासाठी बेकी नाही एकीची गरज – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.14 जुलै – आपल्या आंबेडकरी समाजाला अनेक वर्षापासुन बेकीची लागण लागली आहे.त्यामुळे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होत नाही.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी एकीची गरज आहे.सामाजीक ऐक्य आहे,पण राजकीय ऐक्यासाठी रिपब्लिकन ऐक्याची गरज आहे.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.माता रमाबाई आंबेडकर नगर येथे शहिदांच्या 27 व्या स्मृतीदिनी आयोजित जाहिर अभिवादन सभेत ना.रामदास आठवले बोलत होते.

11 जुलै 1997 रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे माता रमाबाई आंबेडकर नगरात आज्ञाताने विटंबना केली होती.त्याच्या निषेधार्थ भिमसैनिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तेंव्हा निषेध करणाऱ्या भिमसैनिकांवर एसआरपीने बेछुट गोळिबार केला.त्यात 11 जण शहिद झाले.शहिदांच्या स्मृतीदिनी दरवर्षी 11 जुलै ला ना,रामदास आठवले देशात कुठे ही असले तरी माता रमाबाई आंबेडकर नगरात येऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण करतात.
माता रमाबाई आंबेडकर नगरात झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास कोण करणार या बाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम आाहे.येथील चाळींचा ही वेगळा प्रश्न आहे.एम एम आर डी ए येथील झोपड्यांचा सर्व्हे करीत आहे.या पार्श्वभुमीवर माता रमाबाई आंबेडकर नगरातील जनतेच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी
एम एम आर डी ए आणि एस आर ए तसेच सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची स्थानीक रहिवासीयांसोबत संयुक्त बैठक आपण आयोजित करणार आहोत असे ना.रामदास आठवले यांनी यावेळी केले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.आंबेडकरी चळवळीत अनेक शाहीर,लोककवी,सामजीक कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे