निधन
शहरातील उड्डाणपुलावरील भीषण अपघातात वकिलाचा बळी!

अहमदनगर दि. २१ जानेवारी ( प्रतिनिधी)शहरातील उड्डाणपुलावरील भीषण अपघातात वकिलाचा बळी गेल्याची दुर्देवी घटना शुक्रवार दि. २० जानेवारी रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
नगरमधील लेबर कोर्टचे कामकाज पाहणारे प्रसिद्ध नामवंत वकील ॲड.अनिरुद्ध रामचंद्र टाक यांचा पुलावरील वळणावर अपघात झाला त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.ॲड.अनिरुद्ध टाक हे आपल्या दुचाकीवरून जात होते. त्याच दरम्यान एक वाहन त्यांना धडक देऊन निघून गेले त्यात त्यांना जबर मार लागला आणि त्यातच ते मृत्युमुखी पडले.त्यांच्या अपघाती निधनामुळे शहरातील नागरिक तसेच वकील संघटनेकडून हळहळ व्यक्त होत आहे.