गणेश उत्सवानिमित्त नगर तालुका पोलिसांचे वाळकीत मॉकड्रिल कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्याची गय नाही- स.पो.नि.राजेंद्र सानप

अहमनगर ( प्रतिनिधी २६ ) – नगर तालुका पोलिसांनी गणेश उत्सवानिमित्त नगर तालुका पोलिसांचे वाळकीत मॉकड्रिल सकाळी ११ वाजण्याची वेळ , गावातील मुख्य चौकात उपस्थित असलेले गावकरी आपापल्या कामात व्यस्त असताना अचानक चाहुबाजुच्या रस्त्यांनी , गल्ली बोळातून मोठमोठ्याने घोषणा देत जमाव पळत आला . त्यांनी आक्रमक होत जाळपोळ सुरु केली . तेवढ्यात सायरन वाजवत पोलिसांचा मोठा फौजफाटाही गावात दाखल झाला . जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरु केली . मग पोलिसांनी हवेत गोळीबार करत , अश्रु धुराच्या नळकांड्या फोडत जमावावर जोरदार लाठीमार केला आणि दंगल नियंत्रणात आणली . अग्निशामक दलानेही पाण्याचा फवारा मारत आग विझविली
नगर तालुक्यातील वाळकी गावात गुरुवारी ( दि . २५ ) सकाळी घडलेल्या या घटनेने संपूर्ण गाव भयभीत झाले होते . थोड्यावेळाने हे पोलिसांचे मॉक ड्रिल ( दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक ) असल्याचे समजल्यावर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला . आगामी गणेशोत्स तसेच दसरा , दिवाळी या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने हे दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक केले . वाळकी गावात प्रथमच अशा प्रकारचे प्रात्यक्षिक करण्यात आल्याने सुरुवातीला काही काळ गावातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते . नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप,एमआयडीसी पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे , पोलिस उपनिरिक्षक संदीप ढाकणे , सहाय्यक फौजदार दिनकर घोरपडे , पो.हे.कॉ. राहुल थोरात ,रावसाहेब खेडकर , मच्छिंद्र पांढरकर , पो.ना संभाजी बोराडे , ठाणगे , सचिन वनवे , पो.कॉ . राजू खेडकर , जयदत्त बांगर , राजेंद्र ससाणे , महिला पोलीस कर्मचारी जयश्री फुंदे , मोहिनी करडक , गायत्री धनवडे , जायभाय यांच्यासह दोन्ही पोलिस ठाण्यांचा बंदोबस्तासह
अग्निशमन दलाची गाडी , दंगल नियंत्रण पथक , रुग्णवाहिका यांनी हे दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक केले .यावेळी नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना गणेश उत्सवात गावात अचानक दंगल उसळली तर काय करावे याचे हे प्रात्यक्षित असल्याचे सांगण्यात आले . तसेच नगर तालुका पोलिसांच्या पथकाने गावातील मुख्य रस्त्यांवरून संचलन केले .
*******””
गणेशोत्सव साजरा करताना कायदा सुव्यवस्था बिघडवली जाणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी . कायदयाचे पालन गणेश मंडळांनी करावे . गणेश मूर्ती स्थापना तसेच विसर्जन मिरवणूकीसाठी ऑन लाईन अर्ज करून पास घ्यावेत . उत्सवादरम्यान सामाजिक शांतता भंग करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल
.सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद सानप- नगर तालुका पोलिस स्टेशन